Home शहरे मुंबई अंमली पदार्थांचे मुंबई-गोवा कनेक्शन; दोन दलालांना अटक

अंमली पदार्थांचे मुंबई-गोवा कनेक्शन; दोन दलालांना अटक

0
अंमली पदार्थांचे मुंबई-गोवा कनेक्शन; दोन दलालांना अटक

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अमली पदार्थ दलालीचे मुंबई-गोवा हे कनेक्शन उघड झाले आहे. याअंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने () एकाच वेळी दोन ठिकाणी महत्त्वाची कारवाई केली आहे. जेमतेम १२ तासांत या कारवाया करण्यात आल्या.

एनसीबी मुंबईचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात सहा महिन्यांपासून अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. याअंतर्गत एनसीबीने अंधेरी व गोव्यात एकाचवेळी कारवाई करून एकूण ५८ ग्रॅम अम्फेटामाइन, एलएसडी अंमली पदार्थांचे १५ तुकडे, कोकेन, मेफेड्रोन, हेरॉइन तसेच एक्स्टसी या अंमली पदार्थांच्या ५९ गोळ्यांसह दोन दलालांना अटक केली.

एनसीबी मुंबईकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पहिल्या कारवाईत उत्तर गोव्यातील अराम्बोल बीच येथील नेगी कॅफेतून वरील साठा जप्त करण्यात आला. या साठ्यामागे अंमली पदार्थांची टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. नायजेरियन नागरिक असलेला मुस्तफा ऊर्फ टायगर हा ही टोळी चालवत असल्याचे समजले. या नेगी कॅफेचा व्यवस्थापक रणबीर सिंह याला अटक करण्यात आली असून त्याच्या मालकालादेखील समन्स बजाविण्यात आले आहे. मुस्तफा हा उत्तर गोव्यातील कुप्रसिद्ध दलाल आहे. एनसीबीकडून त्याचा माग काढला जात आहे.

दुसऱ्या कारवाईत, एनसीबी मुंबईने अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला सर्कल येथून इरफान अन्सारी या दलालाला अटक केली. त्याच्याकडून एक्स्टसी या अंमली पदार्थांच्या ५६ गोळ्या जप्त करण्यात आल्या. ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. त्यादृष्टीने एनसीबीकडून तपास होत आहे. ‘एक्स्टसी’ हे सहसा पार्टीमध्ये वापरले जात असून खूप महागडे असते. त्यामुळेच ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

[ad_2]

Source link