Home मनोरंजन अनिता हसनंदानीचा अभिनय विश्वाला अलविदा, या कारणासाठी घेतला इतका मोठा निर्णय

अनिता हसनंदानीचा अभिनय विश्वाला अलविदा, या कारणासाठी घेतला इतका मोठा निर्णय

0
अनिता हसनंदानीचा अभिनय विश्वाला अलविदा, या कारणासाठी घेतला इतका मोठा निर्णय

[ad_1]

हायलाइट्स:

  • ख्यातनाम अभिनेत्री अनिता हसनंदानीचा अभिनय क्षेत्राला अलविदा
  • या कारणामुळे अनिताने घेतला हा निर्णय
  • अभिनयाच्या क्षेत्रात परत येण्याबद्दल अद्याप विचार केलेला नाही

मुंबई : टीव्ही विश्वातील ख्यातनाम अभिनेत्री आणि ‘नागिन ५’ मुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या अनित हसनंदानीने अभिनयाच्या क्षेत्राला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अनिताने ‘काव्यांजली’ कार्यक्रमातून लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. अचानकपणे अनिताने हा निर्णय जाहीर केल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिता गेल्या २३ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे.

या कारणासाठी घेतला निर्णय

‘नागिन ५’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अनिताने हा निर्णय घेण्यामागची तिची भूमिका सांगितली. तिने सांगितले, ‘माझा मुलगा आरव अवघा चार महिन्यांचा आहे. जेव्हा मी गरोदर होते तेव्हाच निर्णय घेतला होता की बाळाचा जन्मानंतर अभिनय क्षेत्राला अलविदा करायचं. सध्या मी संपूर्ण लक्ष मुलाच्या संगोपानावर केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय करोनामुळे घेतलेला नाही. मला माझ्या मुलासोबत वेळ घालवायचा असल्याने मी हा निर्णय घेतला आहे.’


अनिताने पुढे सांगितले, ‘आता फक्त माझ्या डोक्यात आरव, त्याचे संगोपन आणि फक्त त्याचेच विचार असतात. मला माहिती नाही की मी पुन्हा छोट्या पडद्यावर अभिनय करेन की नाही. परंतु सध्या तरी मी काम करत आहे. काही उत्पादनांसोबत मी करार केला आहे. मी हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. त्याचे चित्रीकरण घरातच राहून करता येते. हे काम करताना फार टेन्शन येत नाही. जेव्हा मी पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रीय होईन, तेव्हा परिस्थिती सुधारलेली असेल.’


अनिता आपल्या बाळाच्या खाण्यापिण्यापासून, त्याच्या खेळण्यापर्यंत सर्व गोष्टीं अतिशय बारकाईने करते. या कामात तिचा नवरा रोहित रेड्डीही मदत करत असल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. ‘आपल्या बाळाला मोठे होताना पाहणे ही आनंदाची गोष्ट आहे. तो मोठा झाल्यानंतर या गोष्टींचा अनुभव मला घेता येणार नाही. त्यामुळे घरी राहून आरवसोबत मला वेळ घालवता येत असल्याबद्दल खूप आनंद वाटत आहे. करोनामुळे सध्या बाहेर खूपच वाईट परिस्थिती आहे. परंतु लवकरच ही परिस्थिती सुधारेल अशी आशा करू या..’ असे मतही अनिताने व्यक्त केले आहे.


अनिता हसनंदानीने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही आणि सिनेमा क्षेत्रामध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’, ‘काव्यांजली,’ ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसम से ‘ या मालिकांमध्ये अनिताने काम केले होते. तसेच ‘कृष्ण कॉटेज’, ‘कुठ तो है’,’कोई आप सा’ आणि ‘ये दिल’ या सिनेमांमध्ये काम केले होते.



[ad_2]

Source link