Home ताज्या बातम्या आमच्याकडील चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू: संजय राऊत

आमच्याकडील चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू: संजय राऊत

0
आमच्याकडील चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू: संजय राऊत

हायलाइट्स:

  • मराठा आरक्षणावर संजय राऊत यांचं मोठं विधान
  • आमच्याकडील चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू – राऊत
  • रावसाहेब दानवे यांच्या टीकेला दिलं खोचक उत्तर

मुंबई: ‘राजकारणात टाळा आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात. ज्याच्याकडं टाळं आहे, तो कुठल्याही गोष्टीला टाळा लावू शकतो आणि ज्याच्याकडं चावी आहे तो कुठलंही टाळं उघडू शकतो. आमच्याकडं चावी आहे. त्या चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू,’ असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Sanjay Raut on Maratha Reservation)

वाचा:‘आरक्षणाबद्दल मोदींच्या मनात काय आहे हे कळायला हवं’

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राऊतांवर टीका केली होती. संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला दानवे यांनी हाणला होता. त्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिलं. ‘राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री. पक्षाचे आदेश असतात. सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडं चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळं लावलं आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं,’ असा चिमटाही राऊत यांनी काढला. ‘रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहेत. ते बऱ्याचदा विनोद करत असतात. ग्रामीण नेतृत्व आहे. त्यांच्या शैलीचं मी नेहमीच कौतुक केलंय,’ अशी पुस्तीही राऊत यांनी जोडली.

वाचा: लघुशंकेसाठी थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार; नेवाशात थरार

कोल्हापूर इथं सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. ‘कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. तिथून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यातील सर्वच घटकांचा पाठिंबा व सहानुभूती आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडं घातलं आहे. मराठा समाजाच्या नेत्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळं या प्रश्नावर केंद्र सरकार नक्कीच तोडगा काढेल,’ असंही ते म्हणाले.

Live: संभाजीराजेंनी उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटावं – सतेज पाटील

Source link