Home ताज्या बातम्या “आयुष्मान भारत’च्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण

“आयुष्मान भारत’च्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावत चालला आहे. त्यातच आता दिल्लीतील आयुष्मान भारतचे ऑफिस सील करण्यात आले आहे. कारण या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या बाबतची अधिक माहिती देताना आयुष्मान भारत चे सीईओ डॉ. इंदू भूषण म्हणाले, आमच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याने आम्ही गेले पाच दिवसापासून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. येत्या 24 एप्रिल रोजी कार्यालय सुरू केले जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.