औरंगाबाद : शहरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळीच शहरात पुन्हा 17 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 273 वर गेला आहे. 16 रुग्ण हे मुकुंदवाडी येथील आहेत. तर बायचीपुरा परिसरातील एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे औरंगबादकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान शनिवारी दिवसभरात 41 रुग्ण शहरात आढळले होते. त्यात आता या नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या औरंगाबाद शहर ऑड इव्हन फॉम्यूल्यानुसार म्हणजेच सम आणि विषम तारखेनुसार सुरू आहे. सम तारखेला शहरातील दुकाने 7 ते 11 खुली असणार आहे. तर विषम तारखेला संपुर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहून नियमाचं पालन करणं गरजेच आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सुचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.