कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक झाली विस्कळीत

- Advertisement -

मुंबई : आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घाटकोपर येथील गांधी नगर उड्डाणपुलावर कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.विक्रोळीकडे जाणारी वाहतूक देखील मंदावली होती. याबाबत मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर माहिती देण्यात आली होती. अपघात घडलेल्या घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून कंटेनर हटविण्याचे काम केले. दरम्यान काही तासांत वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

- Advertisement -