Home मनोरंजन कतरिना कैफच्या प्रश्नावर भडकला अक्षय कुमार, म्हणाला- ‘तुला थोबाडीत खायची आहे का?’

कतरिना कैफच्या प्रश्नावर भडकला अक्षय कुमार, म्हणाला- ‘तुला थोबाडीत खायची आहे का?’

0
कतरिना कैफच्या प्रश्नावर भडकला अक्षय कुमार, म्हणाला- ‘तुला थोबाडीत खायची आहे का?’

[ad_1]

हायलाइट्स:

  • कतरिनाला अक्षय कुमार, अर्जुन कपूरकडे केली एक मागणी
  • कतरिनाची ही मागणी ऐकून दोघांनीही दिला नकार
  • अक्षय कुमार कतरिना कैफ ही लोकप्रिय जोडी

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकदा एखाद्या अभिनेत्याची आणि अभिनेत्रीची जोडी खूपच लोकप्रिय होते. त्या जोडीला अनेक सिनेमांमध्ये एकत्र पाहायला लोकांना आवडतं. अशा जोडींमध्ये कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्या नावाचा समावेश आवर्जुन करता येईल. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. आज भलेही मोठ्या पडद्यावर कतरिना आणि अक्षय ही हिट जोडी असली तरी पडद्यामागे मात्र कतरिना अक्षयला राखी बांधायला जात होती. वाचून आश्चर्य वाटले ना.. पण हे खरे आहे.

काय घडले होते नेमके

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात २०१६ मध्ये कतरिना सहभागी झाली होती. या मुलाखतीमध्ये कतरिनाने सांगितले की, ‘तीस मार खान’ या सिनेमातील ‘शीला की जवानी’ या गाण्याचे चित्रीकरण होते. त्यावेळी कतरिनाला अक्षयला राखी बांधायची होती. परंतु त्याला अक्षयने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर कतरिनाला अर्जुन कपूरला देखील राखी बांधायची होती, असे तिने या मुलाखतीमध्ये सांगितले.

AssignmentImage-2083565055-1624962366

अक्षय म्हणाला थोबाडीत खायची आहे का?

करण जोहरने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये कतरिनाने जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. तिने सांगितले की,’माझ्याकडून कुणीच राखी बांधून घ्यायला तयार नव्हते. माझ्याकडे कुणीच लक्ष देत नव्हते. मी अशी एक व्यक्ती शोधत होती की तिचा मी सन्मान करते आणि मित्र म्हणू शकते. हे मला योग्य वाटत असल्याने मी अक्षयला राखी बांधू का असे विचारले. त्यावर अक्षयने मला उत्तर दिले की कतरिना तुला माझ्या हातून थोबाडीत खायची आहे का?’

AssignmentImage-61187924-1624962367


राखीचे नाव ऐकून अर्जुन कपूरही दूर पळाला

त्यानंतर कतरिना एकदा तिच्या एका मित्राच्या घरी गेली. तेव्हा तिची भेट अर्जुन कपूरशी झाली. त्यावेळी अर्जुन खूपच जाडा होता. अर्जुनला बघून कतरिनाला त्याला राखी बांधण्याची इच्छा झाली. हे तिने जेव्हा अर्जुनला सांगितले तेव्हा तो तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा अर्जुनला भेटली तेव्हा देखील त्याला राखी बांधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाही तो पळून गेला.

AssignmentImage-1346439020-1624962367


अक्षय आणि कतरिनाने केलेत एकत्र सिनेमे

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी दीवाना कर गए, नमस्ते लंदन, सिंग इज किंग, तीस मार खां, दे दना दन, वेलकम यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले आहे. आता ही जोडी दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात एकत्र दिसणार आहे.

[ad_2]

Source link