Home मनोरंजन करोनाला कसं हरवलं?; मराठी कलाकारांनी शेअर केला अनुभव

करोनाला कसं हरवलं?; मराठी कलाकारांनी शेअर केला अनुभव

0
करोनाला कसं हरवलं?; मराठी कलाकारांनी शेअर केला अनुभव

[ad_1]

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली आहे. करोनाचा संसर्ग झालेल्यांना तर क्वारंटाइनमुळे येणाऱ्या एकटेपणानं आणखी अस्वस्थ वाटू शकतं. पण तरीही खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, मानसिकदृष्ट्या कणखर असायला हवं असं करोनातून बरे झालेले काही कलाकार सांगतात.

​इतरांना सकारात्मकता द्या

करोनाच्या विळख्यातून मी दोनदा बाहेर पडले. सुरुवातीला मनात काहीशी भीती होती. पण, ती भीती मी फार काळ मनात न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा मी क्वारंटाइन होते. ते दिवस मी वैयक्तिक पातळीवर मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहण्यासाठी वेगवेगळे सिनेमे बघत होते. आवडत्या गोष्टीत स्वतःला गुंतवून ठेवायला हवं. जेणेकरून नैराश्य तुमच्या मनात येणार नाही. करोनाच्या दिवसात मानसिकदृष्ट्या स्थिर आणि भक्कम राहण्याची अधिक गरज आहे. तसंच त्या दिवसांमध्ये मी माझ्या ओळखतील व्यक्तींशी (करोनाची लागण झालेल्यांशी) फोनवरुन-व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत होते. त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा देण्याचा मी प्रयत्न केला. क्वारंटाइन असलेल्यांनी असं करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला एकटेपणा भासणार नाही.

– ऋतुजा बागवे, अभिनेत्री

​छोट्या-छोट्या गोष्टींचा अवलंब

माझ्यासाठी पहिले दोन-तीन दिवस अवघड होते. मी घरात एकटी राहूच शकत नाही. कारण मला आजूबाजूला सतत माणसं लागतात. त्यात एकाच खोलीत तर नाहीच. हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. आपल्या लोकांकडून सकारात्मकता मिळते, पण करोना काळात आपल्या लोकांपासून दूर राहायचं होतं. ही बाब पचवणं माझ्यासाठी कठीण होतं. अशा वेळी मी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकांशी संपर्कात राहायचे. सीरिज बघायचे, भरपूर वाचन करायचे. कशा ना कशात मन रमवायचे. छोट्या-छोट्या गोष्टी करायचे. यातून सकारात्मकता मिळत गेली.

– मिताली मयेकर, अभिनेत्री

​दृढ इच्छाशक्ती बाळगा

सकारात्मक राहून आणि दृढ इच्छाशक्ती बाळगून आपण नक्कीच करोनाच्या विळख्यातून बाहेर पडू शकतो. डॉक्टर वैद्यकीयदृष्ट्या आपल्याला बरं करणारच आहेत. पण, त्याबरोबरच आपण आपली मानसिकता भक्कम आणि कायम सकारात्मक ठेवणं अपेक्षित आहे. करोनामधून बरं झाल्यानंतरचे पुढील काही दिवस डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य नियमित पाळा. सकारात्मक विचार करण्यास डॉक्टर आवर्जून सांगतात. मानसिकदृष्ट्या आपण सक्षम राहिलो की औषधांचा अधिक आणि लवकर परिणाम होतो, असंही ते सांगतात. ज्येष्ठ नागरिकांना मी सांगू इच्छितो की, स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवा. मनात कोणतीही भीती बाळगू नका. मला सर्व डॉक्टरांचं कौतुक करायचं आहे. ज्या रुग्णालयात मी दाखल होतो तेथे असलेले सर्व डॉक्टर्स तणावाच्या वातावरणातदेखील रुग्णांशी संयमानं आणि आत्मियतेनं बोलायचे.

– प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक-अभिनेता

​घाबरु नका

सर्वप्रथम घाबरण्याची अजिबात गरज नाही, हे स्वत:ला समजवा. डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. विशेष म्हणजे इतरांच्या कमीत कमी संपर्कात याल ही तुमची जबाबदारी असते. लक्षणांकडे किंवा कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. ते १४ दिवस अवघड असतात. पण वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, हे विसरु नका. मन रमवा, याची खूप मदत होते. यातून जे समाधान मिळतं ते अप्रतिम असतं. गप्पा मारा. शिवाय, वेळापत्रक आखून घेतलं तर फायदा होईल. या काळात मी सोशल मीडियापासून लांब राहणं पसंत केलं, त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहिले.

– अनुजा साठ्ये, अभिनेत्री

[ad_2]

Source link