Home शहरे मुंबई किरकोळ कारणावरून चाकूने वार

किरकोळ कारणावरून चाकूने वार

0
किरकोळ कारणावरून चाकूने वार

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा,

एपीएमसी भाजी मार्केटमधील दोघा तरुणांनी किरकोळ वादातून एकमेकांवर ब्लेड आणि चाकूने वार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मोहम्मद इद्रीस अन्सारी व परवेशकुमार अरुणकुमार पाठक अशी या दोघांची नावे असून दोघेही या हल्ल्यात जखमी झाल्याने एपीएमसी पोलिसांनी दोघांवर उपचार करून दोघांना अटक केली आहे.

आरोपी मोहम्मद व परवेशकुमार हे दोघेही एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये काम करून त्याच ठिकाणी राहतात. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर त्यांनी एकमेकांवर चाकू व ब्लेडने वार केले. यात दोघे जखमी झाल्याने एपीएमसी पोलिसांनी दोघांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

[ad_2]

Source link