Home ताज्या बातम्या कोरेगाव-भीमाप्रकरणी राज्य सरकार समांतर चौकशी करण्याच्या तयारीत – नवाब मलिक

कोरेगाव-भीमाप्रकरणी राज्य सरकार समांतर चौकशी करण्याच्या तयारीत – नवाब मलिक

0

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी राज्य सरकार समांतर चौकशी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावलं टाकण्यास सुरूवात केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. आज मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली होती. या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाल्याची माहिती मलिकांनी दिली.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गृहमंत्री अनिल देशमुख कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात येईल. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. एसआयटी स्थापन करण्याविषयी शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिलं होते. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भामध्ये समांतर एसआयटी स्थापन करण्याची शक्यता आहे. एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केले आहे.