१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास भारतभर सुरूवात देखील झाली आहे. मात्र अद्यापही रूग्णसंख्येतील वाढ आणि रूग्णांचे मृत्यू वाढण्याचा एकदा सुरूच आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.
- Advertisement -