Home मनोरंजन ‘चांगल्या व्यक्तीला दुखवलं जातं तेव्हा…’ एक्स वाइफवर राज कुंद्राच्या आरोपांनंतर शिल्पानं शेअर केली

‘चांगल्या व्यक्तीला दुखवलं जातं तेव्हा…’ एक्स वाइफवर राज कुंद्राच्या आरोपांनंतर शिल्पानं शेअर केली

0
‘चांगल्या व्यक्तीला दुखवलं जातं तेव्हा…’ एक्स वाइफवर राज कुंद्राच्या आरोपांनंतर शिल्पानं शेअर केली

[ad_1]

हायलाइट्स:

  • वैवाहिक आयुष्यातील वादांमुळे शिल्पा शेट्टीचा नवरा आहे चर्चेत
  • राज कुंद्राच्या एक्स वाइफनं शिल्पा शेट्टीवर केले होते गंभीर आरोप
  • राजच्या मुलाखतीनंतर शिल्पानं इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत. पण मागच्या काही दिवसांत राजनं त्याची पहिली पत्नी कविताबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्या पत्नीचं आपल्याच बहिणीच्या पतीशी अफेअर असल्याचं राजनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. काही दिवसांपासून सोशल मीडियावर कविताचा एका जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत होता. ज्यात तिनं शिल्पावर गंभीर आरोप केले होते. पण हे आरोप करण्यासाठी कविताला पैसे देण्यात आले होते असा खुलासा राज कुंद्रानं या मुलाखतीत केला.

शिल्पावर आरोप करण्यासाठी एक्स वाइफला मिळाले होते पैसे…राज कुंद्राचा मोठा गौप्यस्फोट
राज कुंद्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ११ वर्षांनंतर पहिल्यांदाच घटस्फोट आणि पहिली पत्नी या विषयी भाष्य केलं. ज्यात त्यानं शिल्पाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं आता आपण यावर बोलायचं ठरवलं असल्याचं म्हटलं होतं. अर्थात पतीच्या या मुलाखतीवर शिल्पानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. जी सध्या खूप चर्चेत आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘जेव्हा एका चांगल्या व्यक्ती दुखावलं जातं तेव्हा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक चांगल्या व्यक्तीला त्याच्या वेदना होतात.’

तिला बहीण मानलं होतं पण माझ्याच नवऱ्यासोबत… राज कुंद्राच्या बहिणीचा मोठा खुलासा
शिल्पानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकातील पेज शेअर केलं आहे. त्यात लिहिलं आहे, ‘चांगुलपणा हा माणसांना वेगळं करण्यात नसतो. तर प्रत्येक चांगल्या कामात सहभागी होण्यात असतो. त्यामुळे कोणाचं भलं करण्यास उशीर होत असेल किंवा ते काम अयशस्वी होतं तेव्हा त्याचा त्रास सर्वांना होतो. चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच होतं असं आपण नेहमी ऐकतो आणि शांत राहतो कारण आपल्याला वाटतं की, याच्याशी आपला काय संबंध आहे. पण जेव्हा एका चांगल्या व्यक्तीवर हल्ला होतो, त्याला दुखावलं जातं, अटक केली जात, तुरुंगात टाकलं जातं किंवा अपमानित केलं जातं किंवा जगात कुठेही मारलं जातं तेव्हा वाटतं आपण सर्वच थोडे कमी सुरक्षित आहोत.’

AssignmentImage-648660206-1623667748

दरम्यान ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्रानं सांगितलं होतं की, ‘मी या मुद्द्यावर मुलाखत देऊ नये असं शिल्पाचं म्हणणं होतं. पण जेव्हा काही जुने व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत असल्याचं मी पाहिलं तेव्हा मला राहावलं नाही आणि हे व्हिडीओ तिच्या वाढदिवसांच्या नंतर व्हायरल झाले होते. त्यामुळे मी ठरवलं की आता मला बोललंच पाहिजे.’ राज कुंद्रा आणि कविताचं २००३मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही वर्षांनी राजनं शिल्पा शेट्टीशी लग्न केलं. आता या दोघांना विहान आणि समीशा अशी दोन मुलं आहेत.

[ad_2]

Source link