Home ताज्या बातम्या जुन्या भांडणाचा डूख धरून केला खून

जुन्या भांडणाचा डूख धरून केला खून

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २२ मे : मागील वर्षी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका ने दुसऱ्याचा अक्षरशः खून केल्याची घटना भूम (जिल्हा उस्मानाबाद) औद्योगिक वसाहतीत घडली आहे. आठवड्याभराच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात हा तिसरा खून आहे.

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे एक आणि उमरगा तालुक्यातील औराद या ठिकाणी एक आशा दोन खुनाच्या घटना याच आठवड्यात घडल्या आहेत. गुरुवारी २१ मे रोजी भूम तालुक्यातील अरसोली येथील विलास आबासाहेब गोयकर याने बाबासाहेब शिवाजी वाघमोडे यांचा खून केला. ही आठवड्यात झालेली खुनाची तिसरी घटना आहे.

दुपारी चार वाजता गोयकर याने वाघमोडे यांना मोटारसायकलवरून औद्योगिक वसाहतीतील बाणगंगा नदीकिनारी नेऊन दगडाने खून केला. मागच्या वर्षी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी हा खून केला. अशी फिर्याद सुनंदा बाबासाहेब वाघमोडे यांनी भूम पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गोयकर याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.