Home मनोरंजन ठरलं! प्रेक्षकांची ही आवडती मालिका लवकरच घेणार निरोप

ठरलं! प्रेक्षकांची ही आवडती मालिका लवकरच घेणार निरोप

0
ठरलं! प्रेक्षकांची ही आवडती मालिका लवकरच घेणार निरोप

[ad_1]

मुंबई : चार महिन्यांपूर्वी सुरू झालेलं ‘अग्गंबाई सासूबाई‘ या मालिकेचं नवं पर्व ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेच्या रुपात बघायला मिळालं. पहिल्या पर्वात सासूच्या पाठीशी सून आणि आता दुसऱ्या पर्वात सूनेच्या पाठीशी सासू असं चित्र दिसून आलं.

पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक बातमी. ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचं कळतं. मार्च महिन्यात सुरू झालेलं हे नवं पर्व फार लवकर गुंडाळावं लागत असल्यानं टीव्हीविश्वात याविषयी चर्चा रंगली आहे. आता कुठे या मालिकेत रंजक वळण आलं होतं. पण लगेच ही मालिका शेवटाकडे जातेय म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मालिका संपवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कळतं. या महिन्याच्या अखेरीस मालिकेचं चित्रीकरण पूर्ण होईल. तर ऑगस्टमध्ये मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं समजतं. त्यामुळे आता काहीच भाग राहिले असल्यानं मालिका वेगानं पुढे सरकेल यात शंका नाही.

देवमाणूस मालिकेतही ट्विस्ट
देवमाणूस मालिकाही बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी मालिकेत सध्या वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

[ad_2]

Source link