ठेव बुडवत असतील तर तक्रार करा : पोलिसांचे आवाहन

- Advertisement -

उस्मानाबाद । १६ जुलै : शहरातील एका पत संस्थेच्या विरोधात नुकताच पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. ठविदारांच्या ठेवी मुदत संपूनही परत न देण्याचा एक गुन्हा आहे. अशाच प्रकारचे गुन्हे संबंधित पत संस्थेचे असतील तर संबंधितांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठेवीदारांची मुदतठेवी स्वीकारुन ठेवी परत न दिल्यामुळे येथील सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व संचालक मंडळावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची ठेवीची मुदत संपल्यानंतर ज्या ठेवीदारांची रक्कम परत दिलेली नाही. त्या ठेवीदारांनी आपल्या ठेवीच्या मूळ व झेरॉक्स कागदपत्रासह आनंदनगर पोलीस स्टेशनच्या आवारातील आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन आपले ठेवलेले कागदपत्र व म्हणणे सादर करावेत, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी केले आहे.

- Advertisement -