तर महाराष्ट्रात भाजप सत्तेपासून दूर राहू शकतो!
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अंतिम टप्प्यात आला असून भाजप शंभरच्या आसपास जागांवरच अडकला आहे. यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी 90 च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. अशात शिवसेना आणि आघाडीची बेरीज भाजपची डोकेदुखी वाढवणारी आहे.
जर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर सध्याच्या आकडेवारीनूसार त्यांची बेरीज 144 म्हणजेच बहुमताच्या पुढे जाणारी आहे.
सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेची पावर वाढली आहे. अशात आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनेचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.