Home मनोरंजन ‘ती परत आलीये’च्या प्रोमोनं प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता! होतेय ‘तिची’ चर्चा

‘ती परत आलीये’च्या प्रोमोनं प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता! होतेय ‘तिची’ चर्चा

0
‘ती परत आलीये’च्या प्रोमोनं प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता! होतेय ‘तिची’ चर्चा

[ad_1]

हायलाइट्स:

  • देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
  • देवमाणूसच्या जागी नवीन मालिका ‘ती परत आलीये’
  • मालिकेचे प्रोमो रिलीज, प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस‘ मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील कथानक हे उत्कंठावर्धक असल्याने मालिकेने आणि यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. परंतु आता ही मालिका पुढच्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागेवर १६ ऑगस्ट पासून ‘ती परत आलीये‘ ही नवीन गूढ रहस्यमय मालिका रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘ती परत आलीये’ मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर ते टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एका परिसरामध्ये हत्या घडत असल्याने त्या परिसरात विजय कदम गस्त घालताना दिसत आहेत.

‘सगळ्यांनी सावध रहा, मी आहे.’ असा इशारा देत ते फिरताना दिसत आहेत. हे नेमके काय आहे, याची उत्सुकता प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत, याबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या नवीन मालिकेचे लेखनही ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केले आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवणारी असेल, यात शंकाच नाही.


मालिकेसाठी मी देखील कमालीचा खूप उत्सुक आहे!

या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले की, ‘या रहस्यमय मालिकेत काही गूढ गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या परिसरात रहात असलेल्या लोकांचे काही रहस्य आहे का? ‘ती परत आलीये’ म्हणजे नक्की कोण आलीये या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. या रहस्यमय मालिकेत काम करण्यासाठी मी देखील कमालीचा उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे, हे सगळ्यांना लवकरच कळेल. प्रेक्षक या भूमिकेवर नक्की प्रेम करतील अशी माझी खात्री आहे.’

AssignmentImage-1595085790-1626689092


‘देवमाणूस’ घेणार प्रेक्षकांचा निरोप!

छोट्या पडद्यावर ‘देवमाणूस’ ही मालिका गाजते आहे. सध्या मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंह याची अकरा खुनांच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचे दाखवले आहे. अजितकुमार घरी परतल्यावर डिम्पीसोबत त्याचे लग्न उरकण्याची घाई घरची मंडळी करत आहेत. परंतु देवीसिंह पुन्हा हत्येच्या आरोपांमध्ये कसा अडकतो हे दाखवले जाईल आणि त्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.



[ad_2]

Source link