Home मनोरंजन तो छोटा राजन नव्हता ना…नातेवाईकाला मिळाला नाही ICUबेड;सुतापा यांचा संताप

तो छोटा राजन नव्हता ना…नातेवाईकाला मिळाला नाही ICUबेड;सुतापा यांचा संताप

0
तो छोटा राजन नव्हता ना…नातेवाईकाला मिळाला नाही ICUबेड;सुतापा यांचा संताप

[ad_1]

हायलाइट्स:

  • इरफान खान यांच्या पत्नी सुतापा यांच्या भावाचा करोनामुळे मृत्यू
  • सुतापा यांनी ट्विटरवर ट्विट करत व्यक्त केला संताप
  • ट्विट करत सुतापा यांनी दिला सरकारला दोष

मुंबई– देशात करोनाने थैमान घातलं आहे. रुग्णसंख्या वाढतेय. मृत्यूचे आकडेदेखील दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. नुकतंच दिवंगत अभिनेते इरफान खान यांची पत्नी सुतापा यांच्या भावाचं निधन झालं आहे. त्याला करोनाची लागण झाली होती आणि वेळेवर बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असं सुतापा यांनी म्हटलं आहे. सुतापा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. एक ट्विट करत सुतापा यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

करोना- पत्रकार- समीक्षक राजीव मसंद यांची प्रकृती गंभीर

सुतापा यांनी पोस्ट करत त्यांच्या भावाला श्रद्धांजली दिली आणि त्याच्या जाण्याचं कारणही सांगितलं. त्यांनी लिहिलं, ‘मी एका दिवसापूर्वी माझ्या भावाच्या समीर बॅनर्जीच्या मदतीसाठी पोस्ट केली होती. आज ते आम्हाला सोडून गेले. आम्ही भारताच्या राजधानीत दिल्लीत राहतो पण या राजधानीत एका रुग्णांसाठी आयसीयू नाही मिळवू शकलो आणि आम्हाला कुठल्याच इस्पितळात बेडदेखील मिळाला नाही.’ करोना योध्यांना धन्यवाद देत सुतापा यांनी लिहिलं, ‘मी कोरोना योध्यांची आभारी आहे ज्यांनी मला खूप मदत केली. मी तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे, माझे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. मी समीर दादाचं हास्य कधीही विसरू शकत नाही. मी त्यांच्या आठवणींना जपून ठेवेन. पण मी हे कधीही विसरणार नाही की, आम्हाला इस्पितळात बेड मिळाला नाही कारण तो कोणी छोटा राजन नव्हता. तो इमानदार व्यक्ती होता.’

#notanobituary#don’tforget I posted day before for help for my relative Sameer Banerjee.Today he left us .We couldn’t…

Posted by Sutapa Sikdar on Sunday, May 2, 2021

सरकारच्या गोंधळलेल्या कारभारावर आणि अपुऱ्या व्यवस्थेवर भाष्य करत सुतापा यांनी लिहिलं, ‘दिल्लीत झालेल्या या घटनेला मी कधीही विसरू शकत नाही. तुम्ही पण विसरू नका की, अशा अनेक बॅनर्जी, शेख, दास आणि अदजानिया सारख्या कित्येकांना मरायचं आहे. समीर आमच्या सोबत आणखी थोडा काळ राहू शकले असते जर आपण देशातील हिंदू आणि मुस्लिम सणांऐवजी देशातील इस्पितळं, ऑक्सिजन प्लान्ट्सवर जास्त लक्ष केंद्रित केलं असतं तर.’ यासोबतच सुतापा यांनी त्यांचा राग व्यक्त करत दिल्ली सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

एका अटीमुळे तुटलं राज कपूर आणि नर्गिस यांचं नऊ वर्षांचं नातं



[ad_2]

Source link