Home मनोरंजन ‘त्या’ व्यक्तीसाठी ऐश्वर्यानं घेतला होता ४५ लाखांचं मंगळसुत्र बदलण्याचा निर्णय

‘त्या’ व्यक्तीसाठी ऐश्वर्यानं घेतला होता ४५ लाखांचं मंगळसुत्र बदलण्याचा निर्णय

0
‘त्या’ व्यक्तीसाठी ऐश्वर्यानं घेतला होता   ४५ लाखांचं मंगळसुत्र बदलण्याचा निर्णय

[ad_1]

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली. २० एप्रिल २००७ मध्ये लग्न झाले होते. एकेकाळची मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐश्वर्याने जेव्हा अभिषेक बच्चनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची चर्चा त्याहून अधिक लग्नातील कपडे आणि दागिन्यांची चर्चा झाली होती.

ऐश्वर्या राय बच्चनकडे दागिन्यांचे सुंदर कलेक्शन आहे. पण तिच्या मंगळसूत्रानं आकर्षित केलं होतं.विवाहित महिलेच्या आयुष्यात अन्य दागिन्यांच्या तुलनेत मंगळसूत्राचे महत्त्व कित्येक पटीनं अधिक असते. ऐश्वर्या देखील नियमित मंगळसूत्र घालताना दिसते. अभिषेकनं ऐश्वराच्या गळ्यात घातलेल्या या मंगळसुत्राची किंमत तेव्हा जवळपास ४५ लाख रुपये एवढी होती. लग्नानंतर ऐश्वर्या आपल्या कुटुंबीयांसोबत तिरुपति बालाजीची पूजा करण्यासाठी पोहोचलेली असताना या मंगळसुत्राची पहिली झलक पाहायला मिळाली होती.
Photo: लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाल एकत्र नव्हते ऐश्वर्या-अभिषेक, असा केला खास दिवस


पण गेल्या काही दिवसांमध्ये ऐश्वर्या रायच्या मंगळसुत्रामध्ये बदल झाल्याचे दिसून आला. सुरुवातीला तिच्या मंगळसुत्राचं डोरलं वेगळं होतं आणि मंगळसुत्राची लांबी देखील जास्त होती. पण आता तिच्या गळ्यात दिसणारं मंगळसुत्र हे वेगळं आहे. तिचे मंगळसूत्र लांबीमध्ये छोटे दिसत आहे. या मंगळसुत्राची उंची तिच्या गळ्यापर्यंतच आहे. या मागील कारण जाणून घेतल्यानंतर समजले की आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्यानं मंगळसूत्र बदलण्याचा निर्णय घेतला होता.



[ad_2]

Source link