Home ताज्या बातम्या ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे

0
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी’ या विषयावर कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता तसेच मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ राबवित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, या अंतर्गत शेतकऱ्यांना पाणी आणि हवेच्या परिस्थितीनुसार शेती करण्याबाबतचा सल्ला दिला जात आहे. तसेच लागवड केलेल्या जमिनीमध्ये मातीचा पोत, खनिजे आणि बॅक्टेरियाची कमतरता याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. हवामान बदल आणि अनियमित पावसामुळे शेती उत्पादनावर होणाऱ्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन  सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने ही योजना, या योजनेच्या अंमलबजावणी याबाबत या प्रकल्पाचे  कृषी विद्यावेत्ता तथा मृदा विज्ञान तज्ज्ञ श्री. कोळेकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री.कोळेकर यांची मुलाखत बुधवार दि. ६, गुरुवार दि. ७ आणि शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000