Home ताज्या बातम्या ‘निसर्ग’ चक्रीवादळानं रौद्र रूप केलंधारण

‘निसर्ग’ चक्रीवादळानं रौद्र रूप केलंधारण

मुंबई: ‘निसर्ग’ चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं आहे. आता कुठल्याही क्षणी ते किनारपट्टीवर धडकेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते 50 किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. आता ते मुरुडला धडकणार आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीवर होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली परिसरात चक्रीवादळाचा फटका बसायला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे.