Home ताज्या बातम्या पालघर: वाडा-पिवळी बसला अपघात; ४९ विद्यार्थ्यांसह ५२ जखमी

पालघर: वाडा-पिवळी बसला अपघात; ४९ विद्यार्थ्यांसह ५२ जखमी

0

पालघर: जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जांभूळपाडा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सुमारे ४९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. 
पहाटे पिवळीहून वाड्याला जाणारी ही पहिली बस असल्याने स्वामी विवेकानंद महाविद्यालय आणि अ.ल. चंदावरकर महाविद्यालयाचे सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी या बसमध्ये होते. भरधाव वेगात धावणारी ही बस गतिरोधकावर आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात बसमधील ४९ विद्यार्थ्यांसह इतर दोघे प्रवासी जखमी 
झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

वाड्याचे आगार व्यवस्थापक गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सदर बस पिवळी -वाडा मार्गावर धावत असताना जांभूळ पाडा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरून अपघात घडला’ असं ते म्हणाले. एस.टी.प्रशासनाने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रूपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. 

> जखमी विद्यार्थ्यांची नावे: