Home शहरे उस्मानाबाद पोलीस पाटलांना हवं आहे काय? वाचा मगच कळेल !

पोलीस पाटलांना हवं आहे काय? वाचा मगच कळेल !

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २७ मे : पोलीस पाटलांना हवा आहे ५० लाखाचा विमा आणि वेळेवर मानधन. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. जिल्हाधिकारी यांचे मार्फत गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी केली आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील गावपातळीवर महत्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांना मानधन वेळेवर मिळत नसल्याने पोलीस पाटलांचे आर्थिकदृष्टया हाल होत आहेत.

म्हणून गाव कामागार पोलीस पाटलांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पन्नास लाखाचे विमा संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाअध्यक्ष हनुमंत देवकते, दिनकर पाटील आणि धनंजय गुंड यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.