Home ताज्या बातम्या फडणवीस जळगावातील घरी येऊन गेले, एकनाथ खडसे म्हणाले…

फडणवीस जळगावातील घरी येऊन गेले, एकनाथ खडसे म्हणाले…

0
फडणवीस जळगावातील घरी येऊन गेले, एकनाथ खडसे म्हणाले…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. या भेटीबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या घरी दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीबद्दल खडसे यांनी आज स्वत: खुलासा केला आहे. (Eknath Kadse on Devendra Fadnavis Visit to Kothli Residence)

फडणवीस सरकारमध्ये काही काळ मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांनी मागील वर्षी भाजपला रामराम ठोकला होता. पक्ष सोडताना खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. फडणवीसांच्या त्रासाला कंटाळूनच पक्ष सोडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. खडसे हे फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळंच त्यांनी मागील आठवड्यात खडसे यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळं चर्चेला उधाण आलं होतं.

वाचा:‘भाजपमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे, कारण…’

पत्रकारांनी आज याबाबत खडसे यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे जळगावातील माझ्या घरी पहिल्यांदाच आलेत असं नाही. यापूर्वीही आले आहेत. मी विरोधी पक्षनेता असताना फडणवीस हे मुंबईतील माझ्या घरी १२ ते १८ तास असायचे. जेवायचे आणि कधी-कधी झोपायचे देखील. मुंबईतील माझ्या ‘बी ४’ बंगल्यावर ते अनेकदा असायचे. मुख्यमंत्री म्हणूनही ते जळगावला मुक्ताईनगरमध्ये आले होते. सूतगिरणीचं आणि साखर कारखान्याचं उद्घाटन केलं होतं.’

वाचा: ‘ट्विटरवरील ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या’

वाचा: भेटीगाठींचा सिलसिला सुरूच! आता थोरात पोहोचले पवारांच्या घरी

Source link