हायलाइट्स:
- मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळते दुय्यम वागणूक
- अभिनयापेक्षा दिसण्याला आहे जास्त महत्व
- मराठी चित्रपटात कथा असते खरी हिरो
लहानपणी खेळत असताना रणबीरनं असं काही केलं की…नीतू कपूर यांनी सांगितला किस्सा
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक यांनी त्यांचे विचार मांडत म्हटलं, ‘मराठी ही अत्यंत प्रयोगशील मनोरंजनसृष्टी आहे. नाटक असो, मालिका असो की चित्रपट मराठीत पटकथांना फार महत्व दिलं जातं. इथे कथाच खरी हिरो असते. अन् त्या कथेच्या अनुशंगानं कलाकारांना काम मिळतं. परंतु बॉलिवूडमध्ये तसं नाही. तिथे हिरोंना अधिक महत्व दिलं. रोल साध्या माणसाचा असला तरी देखील हिरो रुबाबदार, सुंदर असा दिसतो. अर्थात ग्लॅमर हाच बॉलिवूडचा क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळं मराठीतील अनेक कलाकार त्यांच्या या व्याख्येत बसत नाहीत. कारण मराठी प्रेक्षक रंगरुप पाहून नाही तर कलाकाराचा अभिनय पाहून त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळं मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार हे सर्वसामान्यच दिसतात. अन् त्यांचं ते सामान्यत्व बॉलिवूडला नको आहे. त्यामुळं मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम भूमिका दिल्या जातात.’
बाबो! सुपरस्टार धनुष बांधतोय चक्क १५० कोटींचं आलिशान घर, वाचा काय आहे खास
काही कलाकारांचा अपवाद म्हणून त्यांनी नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि अमोल पालेकर यांची नावं घेतली. परंतु, अशोक यांनी सांगितलेलं हे कारण ऐकून अनेक प्रेक्षकांनी तोंडात बोटं घातली होती. बॉलिवूडच्या चकचकत्या दुनियेमागील सत्य अशोक यांनी प्रेक्षकांना सांगितलं होतं.