Home ताज्या बातम्या भाजपनं आता हे थांबवावं; अंधारात चाचपडू नये; शिवसेनेचा टोला

भाजपनं आता हे थांबवावं; अंधारात चाचपडू नये; शिवसेनेचा टोला

0
भाजपनं आता हे थांबवावं; अंधारात चाचपडू नये; शिवसेनेचा टोला

हायलाइट्स:

  • अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचा ठराव
  • खासदार संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका
  • सीबीआय, ईडी हे भाजपचे सदस्य आहेत का? – राऊत

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं यावरून भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘एखाद्या पक्षाच्या बैठकीत असा ठराव होणं हे आश्चर्यकारक आहे. सीबीआय आणि ईडी हे भाजपचे सदस्य आहेत का,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut Slams BJP Over Misuse of CBI, ED)

वाचा: मोठी घडामोड! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे

ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ‘ईडी आणि सीबीआयशी आमचं काही व्यक्तिगत भांडण नाही. त्या केंद्रीय यंत्रणा आहेत. राष्ट्रीय पातळीवरील प्रकरणांच्या तपासाचे अधिकार त्यांना जरूर आहेत. मात्र, आम्ही सांगू तसं ते करतील ही जी पद्धत घालून दिली जात आहे ती घातक आहे. भाजपच्या वर्तनामुळं या संस्थांचं अवमूल्यन होत आहे. अजित पवार, अनिल परब किंवा आणखी कोणी असेल. त्यांच्या काही आरोप असतील तर त्या आरोपांची चौकशी करण्यास महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सक्षम आहेत. न्यायालय आहे. पण एखाद्या पक्षानं बैठक घेऊन ठराव करणं हे समजण्यापलीकडचं आहे,’ असं राऊत म्हणाले. त्याऐवजी भाजपनं सीआयए, केजीबी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा ठराव करायला हवा होता, असं टोलाही त्यांनी हाणला.

वाचा:बनावट ULC प्रमाणपत्र प्रकरण; मिरा-भाईंदर महापालिकेचा नगररचनाकार ताब्यात

‘भाजपनं आता हे थांबवायला हवं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे होत आली आहेत. हे सरकार तीन वर्षे देखील चांगल्या पद्धतीनं पूर्ण करेल. सीबीआ आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून आपलं सरकार येईल असं कोणाला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडताहेत,’ असं राऊत यांनी सुनावलं.

Source link