सत्ताधारी पक्षाने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मदतीचा निर्णय घ्यायला हवा. कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर आला तेव्हा आम्ही जीआर काढला होता. केंद्र सरकार मदत करेल तेव्हा करेलच. कारण त्याला तांत्रिक मुद्दे असतात. पण राज्य सरकारचे साडेसहा हजार कोटी रुपये लसीकरणामध्ये वाचले आहेत. सरकार व्यापाऱ्यांना मदत करत आहे. केली पाहिजे. पण या नागरिकांना आता तातडीच्या मदतीची गरज आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
भेटीसाठी राज ठाकरेंनी फोन केला होता, भाजप नेत्याचं सूचक विधान
म. टा. विशेष प्रतिनिधीः मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजपनेते सुधीर मुनगंटीवार आणि राज यांचीही भेट होणार आहे. राज यांनी फोन करून भेटायला बोलावले असल्याचे मुनगंटीवार यांनीच नमूद केले असून, त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
- Advertisement -