Home शहरे मुंबई मालाड दुर्घटना हे पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत

मालाड दुर्घटना हे पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत

मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये पिंपरी पाडा परिसरातील झोपडपट्ट्यावर भिंत कोसळून 18 जणांचा दर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 2 वाजता ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली.

मालाड दुर्घटना हे महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे.

पावसासाठी मुंबई महापालिकेने संपूर्ण तयारी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शहरात फिरुन नालेसफाईच्या कामाचा आढावाही घेतला होता, असा दावा राऊतांनी केला आहे.

दरम्यान, मालाडच्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा जास्त जखमी आहेत. राज्य सरकारने मृत्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.