
hw-remosaic: 0;
touch: (0.5979167, 0.5979167);
modeInfo: ;
sceneMode: 32768;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 0.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
मुंबई, दि १७ : हळद उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी हिंगोली येथे मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र स्वंयपूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.
हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राविषयी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. बैठकीस केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, कृषी उपसंचालक सत्यवाना नऱ्हे, कृषी विभागाच्या अवर सचिव वैशाली तांबे उपस्थित होते.
हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध करून देता यावे, तसेच उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करून त्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद ) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असल्याचे सागून राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, या प्रकल्पामधून अधिक नफा होईल याप्रकारे वाटचाल करायची आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागणीचा प्रस्ताव मागवावा. प्रकल्प स्वअर्थसहाय्य बनायला हवा व त्यासाठी आवश्यक तो आराखडा तयार करून कामांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिले.
गेल्या दोन वर्षात या हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत पिकाची होणारी वाढ व पीक परिस्थिती पाहून काय उपाययोजना हाती घ्यायला हव्यात याबाबत जनजागृती करणे, उत्पादन खर्चात बचत करून उत्पादकता वाढवणे, हळद लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करणे यांसारख्या कामात यश मिळवले आहे. हे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र पूर्णत्वात आल्यानंतर यामार्फत शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण माहिती व अर्थसाह्य मिळावे असे, राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.
०००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ