Home ताज्या बातम्या राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत मासेमारीस बंदी; मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत मासेमारीस बंदी; मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

0
राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत मासेमारीस बंदी; मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

हायलाइट्स:

  • १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
  • मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी ही बंदी घालण्याच आली आहे.
  • मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई: मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. (fishing in the state maritime area is prohibited from june 1 to july 31 2021)

जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशात नुसार, दि. १ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.

क्लिक करा आणि वाचा- मुश्रीफ, उठ्या सुट्या बोलत छूटया; भाजप कार्यकर्ते संतापले

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ कलम १४ अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-…तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
क्लिक करा आणि वाचा- अजित पवार यांनी रामदास आठवले यांना केली ‘ही’ विनंती, म्हणाले…

Source link