
मुंबई, दि.20 :चना, तूर, मूग, उडीद आणि मसुर यांसारख्या आवश्यक वस्तूंचा राज्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता कोणीही डाळींचा अनावश्यक व जास्तीचा साठा करू नये, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे,
अफवांपासून सावध राहून जबाबदारीने वागण्याचे आणि गरजेपुरतीच खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे.
0000
मोहिनी राणे/विसंअ/
- Advertisement -