पिंपरी चिंचवड(पुणे):प्रतिनिधी- रमेश कांबळे
रेल्वेच्या अपघातात , १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मृतदेह ट्रकमध्ये असल्याने पुणे मुंबई इंटरसिटी गाडी अर्धा तास लेट,देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ ,शुक्रवारी सांयकाळी 5:30 ते 6: 00 वाजण्याच्या सुमारास ,ही दुर्दैवी घटना घडली .संदेश राजाराम पाटील ,वय-१८, ( सध्या रा.देहूगाव ,ता.हवेली ,जिल्हा पुणे ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत संदेश चे वडील ,देहूरोड येथील लष्करी छावणीत लष्करी जवान म्हणून सेवा करीत आहेत .त्याने आत्महत्या केली की , रेल्वेचा धक्का लागून मृत्यू ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे ,या प्रकरणी देहूरोड रेल्वे लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुणे मुंबई लाईनवर देहूरोड जवळ ,किलो मिटर क्रमांक 166 /5 ते 6 च्या दरम्यान ,हा अपघात झाला , धुरोंतो एक्स्प्रेस गाडी नंबर १९०४ पुण्यकडून मुंबईकडे जाणाऱ्या फाष्ट रेल्वेची धडक बसून संदेश पाटील नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला .या विषयी निश्चित माहिती आरपीएफ आणि सीआरपी एफ च्या कर्मचर्यानी हा मृतदेह रेल्वे ट्रॅक मधून बाजूला केल्या नंतर, इंटरसिटी रेल्वे मुंबईकडे रवाना झाली . मृतदेह छिन्न विच्छिन्न झाल्यान ,ओळख पटण्यास थोडा उशीर लागल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. नाही. संदेश पाटील याने आत्महत्या केली असावी ,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.