सातारा दि.9- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त लोणंद ते फलटण मार्गाबरोबर पालखी स्थळांची पाहणीकरुन वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणचे तहसीलदार समीर यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, सध्या उन्हाळ्याची परिस्थिती पाहता पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व विसाव्याच्या ठिकाणी मंडप उभे करावे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा पुरेशा औषध साठ्यांसह सज्ज ठेवावी.
पालखी मार्गातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावे. जागोजागी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही निर्देश मंत्री श्री चव्हाण यांनी दिले.
प्रांताधिकारी श्री. जाधव व श्री. जगताप यांनी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देवून उन्हाळ्याच्या प्रार्श्वभूमीवर टँकरची संख्या वाढविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
पाहणी दरम्यान तरडगाव ता. फलटण येथील पालखी तळावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
000























WhatsApp