नारायणगाव -नारायणगाव व वारूळवाडी परिसरात (दि. 14) सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. हा पाऊस सुमारे 1 तास सुरू होता. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे.
गेली 4 ते 5 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घामाघूम होत होते. या पावसामुळे वारूळवाडी येथील भाजीबाजारात नागरिकांची धावपळ उडाली होती. त्यात गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.