Home शहरे मुंबई विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – विनोद तावडे

विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – विनोद तावडे

मुंबई: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

श्री. तावडे यांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, सर्वसामान्यांचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून आजच्या अर्थसंकल्पात विविध योजना आणण्यात आल्या आहेत. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून रोजगारासाठी अर्थसंकल्पात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच युवकांचे मनोबल वाढविणारा अर्थसंकल्प आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास व सबका विश्वास सार्थ ठरविणारा व श्री.मोदी यांच्या नवभारताची संकल्पना पूर्णत्वास नेणारा आणि उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सर्वोत्तम बनविण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.