Home बातम्या राजकारण ‘शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून मुंबई पाण्यात जाते’

‘शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून मुंबई पाण्यात जाते’

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळाले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

याविषयी बोलताना आव्हाड यांनी ‘शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणूनच दरवर्षी मुंबई पाण्यात जाते’ अस विधान केले आहे. तसेच ‘नालेसफाईच्या कामाचं आधी टेंडर काढून हे काम मे महिन्यापर्यंत संपणं अपेक्षित असतात. पण हे काम मे महिन्याच्या अखेरीस सुरू केलं जातं आणि जूनच्या सुरुवातीला अर्धवटच संपवलं जातं,’ असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कामावर जोरादार टीका केली आहे.

दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही झालेला पाहायला मिळत आहे. तसेच ज्या ठिकाणी पाणी साठले आहे त्या ठिकाणच्या शाळांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.