Home शहरे अमरावती शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

तिवसा (अमरावती) : तालुक्यातील नमस्कारी येथे शुक्रवारी सकाळी एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात  गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघड झाली.

राहुल हरिदास सोनटक्के (४५, रा.नमस्कारी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ते शेतात गेले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे शेती आहे. गुरुवारचा अवकाळी पाऊस व गारपिटीने त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या शेतात कपाशी व तुरीची लागवड करण्यात आली होती. कापूस वेचणीची मजुरीदेखील सोनटक्के यांच्याकडे थकली होती. या कारणांवरून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा गावकऱ्यांचा कयास आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील,  भाऊ, असा परिवार आहे. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पोलिसांची असंवेदनशीलता
राहुल सोनटक्के यांच्या आत्महत्येची माहिती तिवसा पोलिसांना १२.३० वाजताच्या सुमारास देण्यात आली. तिवसा पोलीस घटनास्थळी दुपारी ३.२० वाजता पोहोचले. पोलीस उशिरा आल्याने अनेक जणांनी संताप व्यक्त केला.