Home मनोरंजन संतापलेल्या जमावापासून नाना पाटेकर यांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव, नाहीतर…

संतापलेल्या जमावापासून नाना पाटेकर यांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव, नाहीतर…

0
संतापलेल्या जमावापासून नाना पाटेकर यांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव, नाहीतर…

[ad_1]

हायलाइट्स:

  • अशोक सराफ आणि नाना पाटेकर आहे एकमेकांचे जीवलग मित्र
  • ‘हमीदाबाईची कोठी’ च्या वेळेस नानांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव
  • अशोक सराफ नानांसाठी पत्त्यांच्या खेळात मुद्दाम हरत

मुंबई– मैत्रीच्या नात्याला तोड नाही, असं म्हणतात ते उगाच नाही. जीवाला जीव देणारा मित्र मिळणं म्हणजे भाग्य. संकटकाळी आपल्यासाठी धावून येणारे हे मित्रच असतात. चित्रपटातील मैत्रीचे सीन पाहून आपल्या मनात अशाच मैत्रीची अपेक्षा निर्माण होते. पण खरे नशीबवान तेच ज्यांना खऱ्या आयुष्यात असे मित्र असतात. ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनादेखील ते भाग्य लाभलं आणि त्यांच्यासाठी नाना पाटेकर अडचणीत धावून आले. खूप कमीजणांना माहीत असेल की, अशोक मामा आणि नाना हे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे किस्सेदेखील अफलातून आहेत. एका मुलाखतीत नानांनी त्यांच्या मैत्रीचा असाच एक किस्सा प्रेक्षकांना सांगितलं होता.

प्पाटप्पातुझ्यात आणि संजनामध्ये काय साम्य आहे? रुपाली भोसले म्हणते, आम्ही दोघीही…

विनोदाचा बादशहा असणारे अशोक सराफ आणि मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीवरही राज्य करणारे नाना पाटेकर एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी एकमेकांसोबत चित्रपटात जरी कमी काम केलं असलं तरी ‘हमीदाबाईची कोठी‘ या नाटकामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली. त्यांनी जवळपास आठ महिने हे नाटक रंगभूमीवर सादर केलं होतं. या आठ महिन्यांच्या कालावधीत त्यांची मैत्री फुलत गेली. याच नाटकाच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनेने अशोक सराफ यांचा जीव धोक्यात आला होता. नानांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, एका प्रयोगादरम्यान काही कारणामुळे प्रयोग रद्द करावा लागला. प्रेक्षकगृहात प्रेक्षक जमले होते. पण प्रयोग रद्द झाल्याचं समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला. अशोक तिथे समोरच असल्याने प्रेक्षक त्यांच्या अंगावर धावून गेले.

AssignmentImage-1128307156-1623403733

त्यावेळी प्रसंगावधान दाखवत नानांनी मामांना प्रेक्षकगृहाच्या मागच्या बाजूने बाहेर काढलं. तिथे उभ्या असलेल्या सायकल रिक्षात बसवलं आणि तिथून धूम ठोकली. त्यावेळेस जर अशोक सराफ प्रेक्षकांच्या हाती लागले असते तर त्यांचं काही खरं नव्हतं. अशा तऱ्हेने नानांनी मामांचा जीव वाचवला होता. नानांनी आणखी एक किस्सा आवर्जून सांगितला तो म्हणजे, ”हमीदाबाईची कोठी’ करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोकला २५० रुपये. त्याने मला पैशांची खूप मदत केली. आम्ही पत्ते खेळत असताना अशोक मुद्दाम हरायचा. जेणेकरून मला १०- २० रुपये मिळतील. तेव्हा मला पैशांची गरज होती.’

Indian Idol 12- ‘चार गाणी गायलेले परीक्षकाच्या खुर्चीत बसलेत’

[ad_2]

Source link