Home मनोरंजन सोशल मीडियावर गायत्री दातारला ट्रोल करण्यापूर्वी १० वेळा करा विचार, कारण…

सोशल मीडियावर गायत्री दातारला ट्रोल करण्यापूर्वी १० वेळा करा विचार, कारण…

0
सोशल मीडियावर गायत्री दातारला ट्रोल करण्यापूर्वी १० वेळा करा विचार, कारण…

[ad_1]

हायलाइट्स:

  • तुला पाहते रे मालिकेतून गायत्रीला मिळाली लोकप्रियता
  • असभ्य भाषेत ट्रोल करणा-यांना गायत्री दाखवते इंगा
  • सोशल मीडियावर रमण्यापेक्षा मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारणे अधिक आवडते

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री दातारला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. आजही या मालिकेतील ईशा याच नावाने तिला अनेकजण ओळखतात. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजातील फोटो गायत्री सातत्याने पोस्ट करत असते. सध्या गायत्री लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधून विनोदी स्किट ती साकारत आहे. तिच्या या विनोदी भूमिकांनाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज्यात चित्रिकरणावर निर्बंध असल्याने या मालिकेचे चित्रिकरण जयपूर येथे सुरू आहे. चित्रिकरणाच्या व्यग्र अशा दिक्रमातून जयपूरने मटा ऑनलाईनशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी तिने विविध विषयांवर आपली मते मांडली.


टीका करा पण…
गायत्री सध्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात विनोदी स्किट सादर करत आहेत. तिच्या या वेगळ्या अंदाजाबाबत तिचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. तर काही जण टीकाही करत आहेत, त्याबद्दल गायत्रीला काय वाटते असे विचारले असता तिने सांगितले, ‘ जर माझ्यावर होणारी टीका ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझम असेल तर मी त्याचे नक्कीच स्वागत करते. जर एखाद्या टीका करणा-या व्यक्तीला माझी एखादी भूमिका आवडली नाही आणि ती का आवडली नाही, त्यात काय दोष होते, काय सुधारणा करायला हवी होती हे जर योग्य पद्धतीने सांगितले असेल आणि अशा पद्धतीने आणकी काही चाहत्यांनी मते व्यक्त केली असतील तर मी त्यावर नक्कीच विचार करते आणि जर ते मला पटले तर माझ्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करते. परंतु अशा प्रकारचा अनुभव फार कमी वेळा येतो.’
गायत्रीने पुढे सांगितले की, ‘ समीक्षात्मक पद्धतीने होणारी टीका कमी असते. उलट निष्कारण टीका करणा-यांची संख्या अधिक असते. अशावेळी तुमच्यावर आरोप होतो की तुम्हांला टीका सहन होत नाही. अशावेळी मी कुणालाही उत्तर न देता त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करते. कारण अशाप्रकारे कोणतेही ठोस कारण नसताना ट्रोलिंग करणा-यांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. जरी माझ्याकडे वेळ असला तरी त्यांच्यावर मला एनर्जी वाया घालवायची नाही. उलट माझे काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, ते अधिक चांगले होण्यासाठी त्यात मी कशाप्रकारे सुधारणा करू शकेन याचा जास्त विचार करून त्यासाठी एनर्जी खर्च करीन. या भरीव गोष्टींवर मी फोकस जास्त देईन.’

अभिनेत्री गायत्री दातारची खास मुलाखत

ट्रोलर्सना अशा शिकवते धड

अनेकदा ट्रोलिंग करताना खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते, त्याबद्दल तुला काय वाटते असा प्रश्न गायत्रीला विचारला असता तिने सांगितले, ‘ सोशल मीडियावर असे काहीजण असतात की ते खूपच वाईट पद्धतीने कमेन्ट करतात. अनेकदा महिलांवर असभ्य भाषेत टीका करतात, त्यांच्या शारिरीक अवयवांवरून अश्लील भाषेत कमेन्ट केली जाते, शिव्या ही दिल्या जातात. मला जेव्हा अशा वाईट प्रकारच्या कमेन्ट येतात तेव्हा मी त्या लोकांची चांगलीच कानउघडणी करत त्यांची चूक दाखवून देते. इतकेच नाही तर त्यानंतरही परत अशाच पद्धतीने कमेन्ट आल्या, मेसेज आले अथवा मला अशा प्रकारच्या कमेन्टमध्ये टॅग करण्यात आले असेल तर तशा प्रकारच्या मेसेजचे मी स्क्रीन शॉट काढून ते स्टोरीवर ठेवते आणि ज्या अकाऊंटवरून हे मेसेज आले असतात त्यांचे रिपोर्ट करते. मग स्टोरीवर ठेवलेले मेसेज पाहून अनेकजण त्या व्यक्तीचे अकाऊंट रिपोर्ट करतात. असे वाईट कमेन्ट करणारे अकाऊंटबद्दल रिपोर्ट करून ती बंद करायला लावली आहेत. अशी मानसिकता असलेल्या लोकांना इथेच थांबवणे खूप गरजेचे असते आणि ते मी करत असते. मला असे वाटते की, महिलांशी अशा प्रकारे बोलण्याची ही पद्धत नाही. महिलांशीच नाही तर अन्य कुणाशीही अशा प्रकारे बोलणे अतिशय चुकीचे आहे. माणूस म्हणून प्रत्येक माणसाचा प्रत्येकाने आदर करायलाच हवा.’

प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायला जास्त आवडते
गायत्री सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते, त्याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, ‘ मी सोशल मीडियावर सक्रीय असले तरी मला स्वतःला व्यक्तिगत आयुष्यामध्ये मोबाईलचा, सोशल मीडियावरून गप्पा मारायला फार आवडत नाही. त्यापेक्षा मला मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी गप्पा मारायला जास्त आवडते. पण मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे सोशल मीडियावर सक्रीय राहणे गरजेचे असते. तुम्ही काय करता हे जाणून घेण्याची तुमच्या चाहत्यांना उत्सुकता असते. त्यासाठी मी सोशल मीडियावर सक्रीय असते.’ सोशल मीडियाच्या फायदा असल्याचे सांगत गायत्री म्हणाली, ‘ आजच्या काळात सोशल मीडियाही प्रचंड पॉवरफुल मीडियम आहे. याच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापर करता येतो. आताच्या करोनाच्याकाळात त्याचे महत्त्व आपण सर्वच जण पाहतो आहेत. मी देखील माझ्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून गरजू लोकांनाचे आलेले मेसेज स्टोरीला ठेवते. माझी स्टोरी पाहून ज्या लोकांना शक्य आहे ते त्यांना मदत करतात अथवा ज्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाऊ शकते अशांच्या संपर्कात त्यांना पोहोचवण्याचे काम करतात. या कारणांमुळे मी सोशल मीडियावर सक्रीय आहे,’ असे गायत्री आवर्जून सांगते.

सकारात्मक विचार करते

सध्याच्याकाळात प्रत्येकाने सकारात्मक विचार करण्याची खूप गरज आहे, असे गायत्री आवर्जून सांगते. तिने पुढे सांगितले की, ‘ आजचा काळ हा सर्वांसाठी खूप कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला शारिरीक फिट राखणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे मानिसकदृष्ट्याही फिट ठेवणे ही तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गरजेचे आहे. सातत्याने सकारात्मक विचार करायला हवा, त्यासाठी आपल्या आजूबाजूचे वातावरण, मित्रमैत्रिणी, घरातील सदस्यांसोबत सातत्याने संवाद साधायला हवा. हा संवाद सकारात्मक पातळीवर असेल तर आपण या संकटातून सहजपणे बाहेर पडू शकतो,’ असा विश्वास गायत्रीने व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर गायत्री दातारला ट्रोल करण्यापूर्वी १० वेळा करा विचार, कारण...

सोशल मीडियावर गायत्री दातारला ट्रोल करण्यापूर्वी १० वेळा करा विचार, कारण…



[ad_2]

Source link