Home मनोरंजन स्वतःच्या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी घेतलं होतं एक रुपयाचं मानधन, पण त्यात होता खास ट्वीस्ट

स्वतःच्या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी घेतलं होतं एक रुपयाचं मानधन, पण त्यात होता खास ट्वीस्ट

0
स्वतःच्या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी घेतलं होतं एक रुपयाचं मानधन, पण त्यात होता खास ट्वीस्ट

[ad_1]

हायलाइट्स:

  • भारताचे ज्येष्ठ अॅथलिट मिल्खा सिंग यांचे १८ जून रोजी रात्री झाले निधन
  • करोनाची लागण झाल्यानंतर मिल्खा सिंग यांच्या महिन्याभरापासून सुरू होते उपचार
  • स्वतःच्याच बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी घेतलं होतं १ रुपयाचं मानधन

मुंबई: ‘फ्लाइंग सिख’ नावानं ओळखले जाणारे भारताचे महान अॅथलिट मिल्खा सिंग यांनी जगाचा निरोप घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर मिल्खा सिंग यांची प्रकृती अधिकच खालावत गेली होती आणि अखेर करोनची लढाई ते हारले. क्रिडा विश्वापासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनीच मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दुःख व्यक्त केलं आहे. मिल्खा सिंग यांचा बायोपिक ‘भाग मिल्खा भाग‘मध्ये त्यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता फरहान अख्तरनंही त्यांना श्रद्धांजली दिली आहे.

‘भाग मिल्खा भाग’ पाहून फरहानवर भडकलेले नसिरुद्दीन शहा

मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित २०१३ मध्ये रिलीज झालेला ‘भाग मिल्खा भाग’ हा बायोपिक मिल्खा सिंग आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूप खास होता. दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि क्रिडा विश्वात पदार्पण करण्यापासून ते भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. त्यावेळी मिल्खा सिंग यांनी आपल्या या बायोपिकसाठी केवळ १ रुपया मानधन म्हणून घेतला होता. पण यात एक खास ट्वीस्ट होता.


राकेश ओम प्रकाश मेहरा आणि त्यांच्या टीमनं मिल्खा सिंग यांना हे मानधन खास पद्धतीनं देण्याचं ठरवलं होतं. ज्याची आठवण कायम राहिल. त्यामुळे त्यांनी मिल्खा सिंग यांना १९५८ मध्ये छापण्यात आलेली १ रुपयाची नोट मानधन म्हणून दिली होती. १९५८ साली मिल्खा सिंग यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत स्वतंत्र भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं.

‘माझ्यासाठी तुम्ही आजही जिवंत आहात’, फरहान अख्तर भावुक

दरम्यान भाग मिल्खा भाग या चित्रपटा मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यानं लिहिलं , ‘प्रिय मिल्खा जी, तुम्ही गेलात हे मानायला अद्याप माझं मन तयार नाही. एखादी गोष्ट हाती घेतली की तडीस न्यायची सवय मी तुमच्याकडूनच शिकलो. ही गोष्ट मी मनात पुरती भिनवून घेतली आहे, त्यामुळे तुम्ही कायमच माझ्यासाठी जिवंत असाल. कारण तुम्ही सहृदय व्यक्ती होता. तुम्ही अनेकांवर प्रेम केले आणि इतकी प्रसिद्धी मिळूनही तुम्हीचे पाय कायमच जमिनीवर राहिले.’


त्याने पुढे लिहिले की, ‘तुम्ही एका विचार मांडला, एका स्वप्नाचे प्रतिनिधीत्व केले होते. तुमच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘मेहनत, खरेपणा आणि दृढ निश्चयाच्या जोरावर एखादी व्यक्ती गगनाला गवसणी घालू शकते.’ तुमच्या या विचारांनी आमच्या सगळ्यांचे आयुष्य व्यापले आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला वडिलांप्रमाणे, मित्राप्रमाणे मानत होते त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद होता. जे तुम्हाला व्यक्तिगतरित्या ओळखत नव्हते त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्तीमत्व होता. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो.’



[ad_2]

Source link