Home शहरे मुंबई ४० टन प्राणवायूसह मुंबईच्या दिशेने निघाली ‘आयएनएस तलवार’

४० टन प्राणवायूसह मुंबईच्या दिशेने निघाली ‘आयएनएस तलवार’

0
४० टन प्राणवायूसह मुंबईच्या दिशेने निघाली ‘आयएनएस तलवार’

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

देशातील करोना रुग्णांसाठी ‘आयएनएस तलवार‘ ही युद्धनौका ४० टन प्राणवायू घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली आहे. फ्रान्स नौदलासह समुद्री सुरक्षेच्या कवायती संपताच नौदलाच्या युद्धनौका ऑक्सिजनसाठी सज्ज झाल्या आहेत. एकूण सात युद्धनौका ऑक्सिजन आणण्यासाठी परदेशात रवाना झाल्या आहेत. त्यातील तब्बल पाच युद्धनौका मुंबईतून रवाना झाल्या आहेत.

करोनाविरुद्धच्या लढ्यात सैन्यदलांनी सहभाग घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदल प्रमुखांना केली आहे. त्यानुसार नौदलाने युद्धनौका या मोहिमेसाठी रवाना केल्या आहेत. त्यात मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडची भूमिका मोलाची आहे. एकूण सातपैकी पाच युद्धनौका मुंबईच्या नौदल तळावरीलच आहेत.

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून ‘आयएनएस तलवार’ व ‘आयएनएस तबर’ या युद्धनौका फ्रान्ससह कवायतींमध्ये सहभागी होत्या. त्यानंतर या युद्धनौका अरबी समुद्रात मोहिमेवर होत्या. पण त्यांना तात्काळ प्राणवायू आणण्यासाठी बहारिन या आखाती देशाकडे वळविण्यात आले आहे. त्यातीलच पहिली नौका ‘आयएनएस तलवार’ ही ४० टन प्राणवायू घेऊन निघाली असून ४ मे रोजी मुंबईत पोहोचत आहे. याशिवाय शनिवारी ‘आयएनएस कोलकाता’ व ‘आयएनएस कोची’, या विनाशिका तसेच ‘आयएनएस त्रिकंड’ ही युद्धनौका दोहासाठी (कतार) रवाना झाली आहे. येत्या आठवडाभरात या सर्व युद्धनौका प्राणवायू घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल होणार आहेत.

ऑपरेशन समुद्री सेतू २

आखातातील येमेन, लेबनन या देशांमधील नागरी युद्धात तसेच ओमानमधील चक्रीवादळात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप आणण्यासाठी नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ मोहिम आरंभली होती. त्यानंतर आता प्राणवायू आणण्याची ही दुसरी मोहीम नौदलाने सुरू केली आहे. याअंतर्गतच ‘आयएनएस ऐरावत’ व ‘आयएनएस जलाश्व’ या दोन युद्धनौका विशाखापट्टणमहून सिंगापूरला रवाना झाल्या आहेत.

[ad_2]

Source link