म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये गोरगरिबांना देण्यासाठी पाठवलेली सहा हजार ४४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थींना वाटलीच नाही. सरकारच्या निष्काळजीमुळे ही डाळ पडून आहे, अशी टीका केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी केली.
केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार आहे का? असा सवाल दानवे यांनी केला. गेल्या वर्षी लॉकडाउन काळात गोरगरीब अन्नापासून वंचित राहू नयेत, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. या अंतर्गत प्रति लाभार्थी पाच किलो गहू अथवा तांदूळ तसेच एक किलो डाळ, एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत देण्यात आली. तसेच, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत प्रवासी मजूर दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले होते त्यांना प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य आणि एक किलो डाळ देण्यात आली.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये गोरगरिबांना देण्यासाठी पाठवलेली सहा हजार ४४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थींना वाटलीच नाही. सरकारच्या निष्काळजीमुळे ही डाळ पडून आहे, अशी टीका केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी केली.
केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार आहे का? असा सवाल दानवे यांनी केला. गेल्या वर्षी लॉकडाउन काळात गोरगरीब अन्नापासून वंचित राहू नयेत, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. या अंतर्गत प्रति लाभार्थी पाच किलो गहू अथवा तांदूळ तसेच एक किलो डाळ, एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत देण्यात आली. तसेच, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत प्रवासी मजूर दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले होते त्यांना प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य आणि एक किलो डाळ देण्यात आली.
आत्मनिर्भर योजनेअंतर्गत १हजार ७६६ मेट्रिक टन डाळ आणि गरीब कल्याण योजनेमध्ये १लाख ११हजार ३३७ मेट्रिक टन अशी एकूण १ लाख १३ हजार ४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्राला दिली होती. मात्र राज्य सरकारच्या निष्काळजीमुळे ६ हजार ४४१ मेट्रिक टन इतकी डाळ शिल्लक राहिली. ही बाब राज्य सरकारने ६ एप्रिल २०२१ रोजी केंद्र सरकारला कळविली. केंद्र सरकारने १५ एप्रिल २०२१ रोजी राज्य सरकारला ही डाळ त्वरित लाभार्थींना वितरित करण्याचा आदेश दिला महाविकास आघाडी सरकारने ही हलगर्जी केली, असा आरोप दानवे यांनी केला.
- Advertisement -