Home गुन्हा 24 दिवस उलटूनही विष्णुच्या मुत्यूच रहस्य गुलदस्त्यातच, अजूनही पोलिसात गुन्हाची नोंद नाही

24 दिवस उलटूनही विष्णुच्या मुत्यूच रहस्य गुलदस्त्यातच, अजूनही पोलिसात गुन्हाची नोंद नाही

0

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साहुर येथील तरुण विष्णु भगवंत लाड (वय २८) हा विवाह समारंभाच्या दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. ९ दिवसानंतर या तरुणाचा छिन्ह विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यांच्या सोबत घातपात झाल्याची दाट शक्यता असतानाही त्यांच्या मुत्यूला २४ दिवस उलटूनही अजूनही पोलिसात गुन्हा दाखल झाला नसून त्याच्या मुत्यूच रहस्य गुलदस्त्यातच आहे. मात्र आपल्या एकुलत्या एका मुलाचा कोणत्या व कशासाठी घातपात घडवून आणला हे पाहण्यासाठी विष्णूचे वृध्द माता पिता पाणावलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहेत.

विष्णूचे शवच्छेदन करणारे डॉक्टर त्याचा मुत्यू कशाने झाला हा प्राथमिक अंदाज सांगण्यास तयार नाहीत. तर पोलीस म्हणतात त्याच्या पिएम रिपोर्ट आल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही. हे पाहता नेमकं पाणी कुठे मुरत आहे हे मात्र कोणालाही समजायला तयार नाही.

मृतकाला ज्वलनशील रसायनिक द्रव टाकुन जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन येत होते. त्यामुळे मृतदेहाची तपासनी करन्याकरिता फाँरेनसिक टिमला घतनास्थळावरच पाचारन करण्यात आले होते. व घटनास्थळीच अंतोरा येथील डाँ. मंडारी यांनी पोस्टमार्टम केले परंतु डाँ मंडारी यांनी २९ तारखेला दिलेल्या रीपोर्ट वरुन काही निश्पन्न न झाल्याने आता सि. ए सँम्पलच्या रिपोर्टची वाट आष्टि पोलीस पाहत आहे.