Home बातम्या ऐतिहासिक ‘ग्रामीण आवास’बाबत डॉ.राजाराम दिघे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

‘ग्रामीण आवास’बाबत डॉ.राजाराम दिघे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

0
‘ग्रामीण आवास’बाबत डॉ.राजाराम दिघे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 6 एप्रिल, गुरूवार 7 एप्रिल, शुक्रवार 8 एप्रिल व शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्य शासन प्रत्येक कुटुंबाला आपल्या हक्काचे आणि मालकीचे घर मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. विशेषतः ग्रामीण भागात घरांची निर्मिती व्हावी, सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने महा आवास अभियान-ग्रामीणची सुरूवात केली असून त्याद्वारे  लाखो गरिब, गरजू, भूमिहीन व बेघरांचे घरकुलाचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत अधिक  सविस्तर माहिती राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००