Home बातम्या मुंबई, साताऱ्यात तिघांचा बुडून मृत्यू

मुंबई, साताऱ्यात तिघांचा बुडून मृत्यू

0

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई आणि साताऱ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईत एकजण पाण्यात वाहून गेला तर साताऱ्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. 

धारावीच्या राजीव गांधी नगराच्या बाजूला राजा मेहबूब शेख हा तरूण पाण्यात पडून वाहून गेला. अग्निशमन दलाचे जवान या तरुणाचा शोध घेत असून त्याचा अद्यापही शोध लागला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

तर सातारा येथे पर्यटनासाठी येणं दोन पर्यटकांच्या जीवावर बेतलं आहे. धबधब्यात भिजण्याचा आनंद लूटत असताना या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. या दोघांची नाव समजू शकली नाहीत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.