Home शहरे जळगाव नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्वपूर्ण -प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्वपूर्ण -प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर

0

प्र.मानसिक आरोग्यावर कुलगुरु क.ब.चौ.उ.म.वि.जनजागृतीसाठी एरंडोल महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम.
एरंडोल : प्रतिनिधी
शैक्षणिक संस्थांनी केवळ पारंपरिक शिक्षणक्रमास प्राध्यान्य न देता समाजाभिमूख उपक्रम राबवावे ज्यात सुदृढ मानसिक आरोग्य आणि मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी जाणीपूर्वक प्रयत्न केले जावेत, हेच नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षीत असल्याचे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी.पी. माहुलीकर यांनी मांडले.
एरंडोल येथील दादासाो. दिशंबर शंकर पाटील महाविद्यालयात दि. 20 सप्टेंबर रोजी मानसिक स्वास्थ्य, मानसिक आजार व त्यावरील उपचार या विषयावर पोश्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उद्घाटनपर संबोधनात प्रा. माहुलीकर बोलत होते. विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वाथ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे नविन शैक्षणिक धोरणात मानसिक स्वास्थ्यावर अधिक भर दिलेला आहे. त्यासाठी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयात अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जावेत आणि या उपक्रमांसाठी विद्यापीठाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल. प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशन केंद्र स्थापन करुन विद्यार्थ्यां बरोबर समाजातील अन्य घटकांच्याही मानसिक अडचणी सोडविल्या जाव्यात. मानसिक आरोग्यावर आधारित एका नव्या व अभिनव उपक्रमाची सुरुवात एरंडोल महाविद्यालयाने केली म्हणून त्यांनी विशेष प्राचार्य आणि संस्थेचे अभिनंदन केले.
मानसिक आरोग्यावर आधारित या पोस्टर स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्हयांतील 22 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या महाविद्यालयांमधून पदवीगटातून – 40 आणि पदव्युत्तर गटातून व 19 असे 59 पोस्टर्स लावण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना सर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्याहित करणारे विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक ही स्पर्धकांसोबत संघव्यवस्थापक म्हणून उपस्थित होते.

सदर स्पर्धेचे उदघाटन कबचौ उमवि, जळगांव चे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. माहुलीकर यांचे हस्ते फित कापून झाले. उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अमीत पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डी. आर. पाटील, माधवराव पाटील, आनंदराव पाटील, हे होते. व्यासपीठावर डॉ. श्री. शरद पाटील, मा. श्री. जगदिश पाटील, प्रा. एस. पी. पाटील, प्रा. एस. एम. पवार प्रा. डॉ. सी. पी. लभाणे, सुप्रसिध्द मनोचिकित्स डॉ. प्रदिप जोशी, सुप्रसिध्द समाजसेवक व आशा फाऊंडेशन, जळगावं चे प्रमुख गिरीष कुळकर्णी व मानसशास्त्रज्ञ वीना महाजन, मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष गोकुळ चौधरी, समन्वयक व उपप्राचार्य.डॉ. अरविंद बडगुजर हे होते. दुपारच्या सत्रात परिक्षणानंतर परिक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहिर केला व नंतर विजेत्या स्पर्धकांना एरंडोल शहराचे नगराध्यक्ष मा. श्री. रमेश परदेशी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रेखा साळुंखे यांनी केले.
याप्रसंगी मानसिक आरोग्यावर सहभागी विद्यार्थ्यांचे पोस्टर इंद्रधनुष्य, युवारंग, साहित्य संमेलन आणि इतर कार्यक्रमात ठिक-ठिकाणी लावण्यात येतील जेणे करुन विद्यार्थ्यांना व नागरीकांनाही या विषयावर जाणीव जागृती होईल असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. डी. आर. पाटील यांनी सांगितले.तसेच जनजागृतीची आवश्यकता असल्याचे विद्यापीठातील मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. गोकुळ चौधरी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छापर भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे अतिथी व संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी आपल्या भाषणातून मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवावे व त्याला अध्यात्माची जोड कशी देता येईल ते सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील,संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रदर्शनाचा लाभ एरंडोल शहरातील नागरिक,शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थी,गावातील बहुसंख्य नागरिक यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.राम वानखेडे,प्रा.स्वाती शेलार यांनी केले तर आभार प्रा.सी.वाय. पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
फोटो –