Home ताज्या बातम्या “अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावे लागले तरी चालेल पण एकही शेतकरी मदतीविना राहणार नाही”

“अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावे लागले तरी चालेल पण एकही शेतकरी मदतीविना राहणार नाही”

0

मुंबई : योग्य व्यक्तींना लाभ देण्यासाठी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावे लागले तरी चालेल, पण एकही शेतकरी मदतीविना राहता कामा नये. प्रत्येकाला मदत मिळेल यासाठी जोरकस आणि मिशन मोडवर प्रयत्न करावे अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

पीकविम्याची मदत मिळण्यासाठी गावांतच अर्ज भरून घ्यावे, सरकारी यंत्रणेने विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यात समन्वयाची भूमिका वठवावी. निधीची कुठलीही कमतरता राज्य सरकारच्या वतीने भासू दिली जाणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. या आपत्तीला ओला दुष्काळ समजून शेतकर्‍यांना संपूर्ण मदत दिली जाईल. शेतकर्‍यांना कुठल्याही वसुलीला सामोरे जावे लागू नये, हेही सुनिश्चित केले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ऑक्टोबरच्या अवकाळी पावसाने झाले आहे. पण, शेतकर्‍यांनी अजीबात चिंता करू नये. राज्य सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पिडित शेतकऱ्यांना दिली.