Home ताज्या बातम्या जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0

धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या प्रचारार्थ नरडाणा येथे आयोजित प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सर्वाधिक १०५ जागा भाजपाला मिळाल्या. जे हरले त्यांच्यासोबत शिवसेना निघून गेली. जनतेशी बेईमानी करून हे सरकार आले आहे. 

याचबरोबर, विधानसभा निवडणुकीत जनादेश महायुतीला मिळाला होता.मात्र शिवसेनेने सत्तेसाठी विश्वासघात करुन दुसऱ्यांशी घरोबा केला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले आणि ४० टक्के असलेल्या विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभा अशा 2 निवडणुका झाल्या. यामध्ये जनतेने भाजपाला पसंती दिली. देशाचा इतिहास सांगतो, बेईमानीने स्थापन झालेले सरकार 7 महिन्यांच्यावर चालत नाही. सत्य परेशान होता है पराजित नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.