नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषण करत आहेत. यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर हल्ला चढवताना सांगितले की, या देशात केवळ सरकारच बदलले नाही, तर काम करण्याची दिशा देखील बदलली आहे. ते म्हणाले की, जर हे सरकार मागील सरकारच्या धर्तीवर चालत राहिले असते तर जम्मू-काश्मीरमधून कलम 370 कधीच हटले नसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कवी सर्वेश्वर दयाल सक्सेनाच्या काही ओळी वाचल्या. ते म्हणाले, “लीक पर वे चलें जिनके चरण दुर्बल और हारे हैं. हमें तो जो हमारी यात्रा से बने, ऐसे अनिर्मित पथ ही प्यारे हैं.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर आपण कॉंग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर शत्रूंच्या मालमत्तेचे कायदे केले नसते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नेमणूक झाली नसती. जर आपण कॉंग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर 50 वर्षांनंतरही शत्रूंच्या मालमत्तेची प्रतीक्षा करावी लागली असती. आमचा प्रयत्न वेग तसेच स्केल वाढवण्याचा आहे. पंतप्रधान म्हणाले की, जलद काम केल्याचा परिणाम हा आहे की, 5 वर्षात लोकांनी काम पाहिल्यानंतर त्यांनी त्याच पद्धतीने अधिक सामर्थ्याने पुन्हा सेवा करण्याची संधी आम्हाला दिली.