उस्मानाबाद : शेतक-यांची संध्याकाळची नाईट लाईफ बंद करूण, त्यांना दिवसा वीज देण्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना राञीची वीज देण्यापेक्षा दिवसा वीज देण महत्त्वाच आहे. त्यासाठी कार्यक्रम बनवण सरकारसाठी गरजेच असून शेतकऱ्यांच्या या भावना आम्ही सरकार पर्यंत पोहचवू, अस राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उस्मानाबादेत पञकार परिषदेत बोलताना सांगितलं. याबाबत ए.एम न्यूजने खास रिपोर्ट च्या माध्यमातून ही शेतकऱ्यांना अडचणीची नाईट लाईफ सर्वांसमोर आणली होती.
शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीबेरात्री जावे लागणार नाही. शेतकरी हा सुद्धा माणूस आहे, याचे भान वीज कंपनीने ठेवायला हवे. कुठलाही राजकीय नेता, शासकीय अधिकारी आठ तासांपेक्षा अधिक काम करीत नाही. मात्र दिवसभर शेतात राबूनही शेतकऱ्याला रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. अनेकदा प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश, विंचू दंश होत असतो. अशा प्रतिक्रीया शेतकरी वर्गांकडून येत आहेत.